कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. या धरणात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४४.७० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला असून, धरण ४४.६५ टक्के भरले आहे. इतर प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या कोयना धरण क्षेत्रात पाऊस उघडला आहे. मागील पंधरा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात भरीव वाढ झाली आहे. सध्या धरणाची ५० टक्क्यांकडे वाटचाल सुरू असतानाच मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर पूर्ण ओसरला आहे. यामुळे धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. धोम धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी दमदार पावसाची गरज असून, सध्या या धरणात २६.३९ टक्के पाणीसाठा झाला आहे.

तारळी, कण्हेर, धोम-बलकवडी, वीर या धरणांत ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्याच्या दुष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उरमोडी धरणात ४१.८७ टक्के, तर निरा-देवघर धरणात ४१.१४ टक्के, भाटघर धरणात ४६.८७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण भरण्यासाठी जुलै व आॅगस्ट महिन्यात होणारा पाऊस उपयुक्त ठरत असतो. यामुळे पुढील दीड महिन्यात किती पाऊस होईल, यावरच धरणांतील पाण्याचे भवितव्य ठरेल.  

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी) टक्केवारी 
धरण पाणीसाठा टक्केवारी
कोयना  ४४.७०  ४४.६५
धोम ३.०८  २६.३९
धोम-बलकवडी २.०६ ५१.९३
कण्हेर  ५.२५ ५४.७२
उरमोडी  ४.०४   ४१.८७
तारळी  ४.२०१  ७१.९३
निरा-देवघर   ५.५३ ४७.१४
भाटघर ११.०१ ४६.८७
वीर ६.४३ ६८.३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com