सातारा :बेसुमार वृक्षतोडीमुळे कोयनेचे पाणी लाल

कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वृक्षतोड होत असल्याने पावसाळ्यात धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा रंग लाल व तांबडा दिसत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे.
बेसुमार वृक्षतोडीमुळे कोयनेचे पाणी लाल Koyne's water is red due to excessive deforestation
बेसुमार वृक्षतोडीमुळे कोयनेचे पाणी लाल Koyne's water is red due to excessive deforestation

सातारा : कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वृक्षतोड होत असल्याने पावसाळ्यात धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा रंग लाल व तांबडा दिसत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. झाडांची कत्तल करणाऱ्यांना सरकारचे अभय आहे. येत्या महिनाभरात या परिसरातील अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी (ता. २) पत्रकार परिषदेत दिला.  गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हाहाकार माजविला होता. या काळात कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर लालसर रंगाचे पाणी दिसून आले. हा प्रकार कोयना, चांदोली व राधानगरी या धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याने होत आहे. या परिसरातून ट्रक भरून झाडांचे लाकडे बाहेर जात आहेत. झाडांच्या कत्तलीला राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभय आहे. हा प्रकार तत्काळ न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. अनधिकृतपणे झाडांच्या कत्तली करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वन विभागाला निवेदन देण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.  दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ते दिले जात असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचे सांगत सरकार फसवणूक करत आहे. भाजपने गेल्या पंचवार्षिकमध्ये व सध्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचे पैसे द्यावे अन्यथा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष विकास जाधव, शिवाजी नांदखिले, राजेंद्र बर्गे आदी उपस्थित होते.  धरणातून होणारा विसर्ग घटला कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे साडेदहा फुटांवर उघडण्यात आलेले धरणाचे दरवाजे दीड फुटांवर आणण्यात आले आहेत. धरणातून नदीपात्रात नऊ हजार ९२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काही दिवसांपासून पाण्याखाली गेलेला मूळगाव येथील पूल पाण्याबाहेर आला आहे. सध्या धरणात येणाऱ्या पाण्याची सरासरी आवक नऊ हजार ९२५ क्युसेक झाली आहे. धरणात ८५.०६ टीएमसी पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com