नागपूर : रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना डीएपी तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. विदर्भातील अनेक कृषी सेवा केंद्र चालक तुटवडा असल्याचे सांगत इतर खत शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात सध्या डीएपीची मागणी वाढली आहे. पश्चिम विदर्भात असलेल्या अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, बुलडाणा या पाच जिल्ह्यांमध्ये हरभरा लागवड क्षेत्र मोठे आहे. हरभरा उत्पादक शेतकरी लागवडीच्या वेळी डीएपीचा वापर करतात. सर्वांत स्वस्त असल्याने याच खताला शेतकऱ्यांची मागणी राहते.
अमरावती जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांपासून खताची रॅक लागली नाही. त्यामुळे खताची उपलब्धता कशी असेल? त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना इतर खत द्यावी लागत आहेत. खताच्या दरात जास्त फरक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा पर्याय देखील वापरण्यास पूरक ठरतो. - नीलेश गांधी, संचालक, कृषी सेवा केंद्र, अमरावती - डीएपीची मागणी आणि पुरवठा (टनांत)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.