खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांचे नुकसान

खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांचे नुकसान
खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांचे नुकसान

अमरावती : शासकीय खरेदीबाबत प्रशासनाच्या पातळीवर कोणत्याच हालचाली नाहीत. त्यामुळे बाजारात व्यापाऱ्यांकडून अवघ्या ३६०० रुपये क्‍विंटलने हरभऱ्याची खरेदी होत आहे. हरभऱ्याचा हमीभाव ४६२० रुपये असल्याने ६०० ते १००० रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.  

जिल्ह्यात हरभरा, तूर, कापूस, सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. मागील तीन वर्षांपासून ऐन हंगामात या तीनही शेतमाल उत्पादकांना अपेक्षित दर मिळाला नाही. गेल्या तीन वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे कोरडवाहू क्षेत्रातून अपेक्षित उत्पादकता आणि दरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍याचे सावट आहे. या वेळी हरभऱ्याच्या बाबतीत देखील शासकीय अनास्था कायम असल्याचे चित्र आहे. 

शासनाने यावर्षी ४६२० रुपयांचा हमीभाव हरभऱ्याला जाहीर केला. त्यामुळे शासकीय खरेदी सुरू होऊन किमान हमीभाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु, हरभऱ्याचा हंगाम ऐन भरात असताना अद्याप शासकीय खरेदीसंदर्भाने कोणत्याच हालचाली शासकीय पातळीवर नाहीत. त्यामुळे जानेवारीत सरासरी ५ हजार रुपये क्‍विंटलवर असलेले हरभऱ्याचे दर ३६०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. 

खरेदी झाली होती बंद

मागीलवर्षी खरेदी विक्री केंद्रावरील घोळ, चुकारे मिळण्यास विलंब, ते भलत्याच खात्यात जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास झाला. अनेक केंद्रावर व्यापाऱ्यांचा माल खरेदी करण्यात आल्याचीही चर्चा रंगली. याप्रकारामुळे काही केंद्रांवर अल्पावधीतच खरेदी बंद करण्यात आली होती.

हरभरा दृष्टिक्षेपात

जिल्ह्यातील लागवड ८१ हजार ५६० हेक्‍टर
सरासरी उत्पादन ६ ते १० क्‍विंटल प्रतिएकर
सध्याचे किमान दर ३६०० ते ४००० रुपये क्‍विंटल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com