वीज जोडणी न देताच कृषीपंपाची लाखोंची वीजबिले ! शेतकरी बसले उपोषणाला

कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पाच शेतकऱ्यांच्या शेतात शेतीपंप वीज जोडणी न करताच गेल्या सहा वर्षांपासूनचे लाखों रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या माथी लावण्याचे काम ‘महावितरण’ने केले आहे.
electricity
electricity

नांदेड : कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पाच शेतकऱ्यांच्या शेतात शेतीपंप वीज जोडणी न करताच गेल्या सहा वर्षांपासूनचे लाखों रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या माथी लावण्याचे काम ‘महावितरण’ने केले आहे. याबाबत तक्रार करुनही उपयोग झाला नसल्याने शेतकऱ्यांनी ‘महावितरण’च्या कार्यालयापुढे सोमवारपासून (ता. २३) उपोषण सुरु केले आहे. कुंडलवाडी येथील शेतकरी अशोक रामजी गायकवाड, भूमाबाइ सायलू करेवाड, राजन्ना राजन्ना नागूलवाड, रामलू हूसेना कोटलावार व धनराज हनमंत रत्नागीरे या शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी विज मिळावी, यासाठी २०१४ मध्ये महावितरण कंपनीला अर्ज केले होते. यानंतर विद्युत जोडणी झाली नाही. परंतु विजबिल मात्र लाखोंची आली आहेत.  याबाबत महावितरणशी संपर्क केला असता, त्यांनी कनेक्शनचे सर्वे चालू आहे, सर्वे पूर्ण झाले, पुढच्या वर्षी पोल येणार आहेत, सरकार बदलले, ठेकेदार काम करीत नाहीत, असे उत्तरे देण्यात आली आहेत, उत्तर मिळत नसल्याने चौकशी करुन संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. परंतु त्याचाही उपयोग झाला नसल्याने येथील शेतकऱ्यांनी सोमवारपासून महावितरण कंपनीच्या कुंडलवाडी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com