महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियान

जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज ओळखून औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्र जिल्हाभर जमीन आरोग्य सुधार अभियान राबविणार आहे.
soil health
soil health

औरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज ओळखून औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्र जिल्हाभर जमीन आरोग्य सुधार अभियान राबविणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत हे अभियान सुरू राहणार असून, यामध्ये प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेटी, प्रात्यक्षिके, वेबिनार, प्रशिक्षण असे कार्यक्रम शेतकऱ्यांच्या सहभागातून होणार आहेत.  कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने मंगळवारी (ता. १) घेण्यात आलेल्या ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ मंच उपक्रमात समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी ही माहिती दिली. डॉ. झाडे म्हणाले, ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या प्रेरणेतून व विद्यापिठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांच्या मार्गदर्शनातून जमीन आरोग्य सुधार अभियान कृषी विज्ञान केंद्र हाती घेत आहे.’’  ‘‘जमिनीच्या सुपीकतेवर पिकाचे भवितव्य अवलंबून आहे. प्राप्त परिस्थितीत जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज ओळखून हा उपक्रम कृषी विज्ञान केंद्र हाती घेत आहे. त्यासाठी १ ते ३१ डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ऊस पाचट व्यवस्थापन, कपाशी पीक पऱ्हाटी व्यवस्थापन, गहू पीक भुसा व्यवस्थापन न जाळता कसे करता येईल आदींविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे,’’ असे डॉ. झाडे म्हणाले.   डॉ. झाडे म्हणाले, की जमीन सुपीकतेसाठी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हे अभियान कृषी विज्ञान केंद्र हाती घेते आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेटी, प्रात्यक्षिके, वेबिनार, प्रशिक्षण कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा परिषद कृषी विभाग आदींच्या समन्वयातून हे अभियान राबविण्यात येणार आहे.  मंगळवारी शेतकरी शास्त्रज्ञ मंच ऑनलाइन मंच उपक्रमात सुधारित ऊस पीक लागवड तंत्रज्ञान व रब्बी पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. बी. व्ही. भेदे यांनी गहू, हरभरा, ज्वारी, करडई, मका तसेच भाजीपाला पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी माहिती देत किडींची ओळख करून दिली. या ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ मंच उपक्रमात शेतकरी, तज्ञ व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. ऊस पाचट न जाळता त्याची कुट्टी करून शेतात पसरवा.. कृषी विद्यावेत्ता प्रा. ए. व्ही. गुट्टे यांनी सुधारित ऊस पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. गुट्टे म्हणाले, की शेतकऱ्यांनी ऊस लागवड ५ बाय १.५ फूट अंतरावर करावी. ठिबक सिंचनाच्या वापरासह विद्राव्य खत व्यवस्थापन करावे व ऊस पाचट न जाळता त्याची कुट्टी करून शेतात पसरावी. ऊस पिकाची दोन वेळेस बांधणी करावी. पहिली बांधणी ७५ दिवसांनी एक फुटापर्यंत करावी. १२० ते १३५ दिवसांत दुसरी बांधणी १.५ ते २ फुटांपर्यंत करावी. ऊस पिकात आंतर पीक म्हणून भुईमूग, फ्लॉवर, पत्ताकोबी, कोथिंबीर व टरबूज आदी पिकांचा अंतर्भाव करावा.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com