मिरजोळेत भूस्खलनामुळे भातशेती धोक्यात

मिरजोळेत भूस्खलनामुळे भातशेती धोक्यात
मिरजोळेत भूस्खलनामुळे भातशेती धोक्यात

रत्नागिरी : नदीचे पात्र बदलल्यामुळे मिरजोळे-मधलीवाडीत पुन्हा मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊ लागले आहे. त्यामुळे आजूबाजूची भातशेती धोक्यात आली आहे. गेली पंधरा वर्षे हा प्रकार सुरू असून, त्यावर अद्यापही कायमस्वरूपी उपायोजना करण्यात शासनाला यश आलेले नाही. या ठिकाणी सुमारे सोळा एकर भातशेती आहे.

या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे देण्यात आला होता. त्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे; मात्र निधी अभावी त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा, अशी मागणीही करण्यात आली असून, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत.

गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मिरजोळे येथील नदीला पाणी आहे. नदीचे पात्र डोंगराच्या बाजूने वळले आहे. मोठे दगड आल्यामुळे नदीपात्र बदलल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता. २२) भूस्खलन सुरू झाले. या भागात पाडावेवाडीतील काही शेतकऱ्यांची जमीन असून, तिथे भातशेती लावण्यात आली आहे. या भागापासून तीनशे मीटरहून अधिक अंतरावर लोकवस्ती आहे.

भातशेती वाचविण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत. या भागाची तहसीलदार शशिकांत जाधव यांनी पाहणी केली. याबाबत ते म्हणाले, की मिरजोळे येथे दहा मीटरपर्यंत भेगा गेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ महत्त्वाची बैठक बोलावली असून, भूगर्भशास्त्रज्ञांना पाचारण केले आहे. धोकादायक भागात शेती करण्यास जाऊ नये, अशा सूचना शेतकऱ्यांना दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com