पुण्यातून गावाकडे जाण्यासाठी रेल्वे, बस स्थानकांवर झुंबड

पुणे : कोरोना विषाणूची बाधा आणि ३१ मार्चपर्यंत कामकाज ठप्प राहण्याच्या शक्यतेमुळे पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातून सुमारे दहा लाखाहून जास्त नागरिक गावाकडे परतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुण्याच्या रेल्वे तसेच बसस्थानकावर शनिवारी सकाळपासून प्रवाशांचे लोंढे दिसत होते.
पुण्यातून गावाकडे जाण्यासाठी रेल्वे, बस स्थानकांवर झुंबड
पुण्यातून गावाकडे जाण्यासाठी रेल्वे, बस स्थानकांवर झुंबड

पुणे  : कोरोना विषाणूची बाधा आणि ३१ मार्चपर्यंत कामकाज ठप्प राहण्याच्या शक्यतेमुळे पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातून सुमारे दहा लाखाहून जास्त नागरिक गावाकडे परतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुण्याच्या रेल्वे तसेच बसस्थानकावर शनिवारी सकाळपासून प्रवाशांचे लोंढे दिसत होते. पुणे रेल्वेस्थानकावर गुरूवारपासून प्रवाशांची असलेली गर्दी शुक्रवारी वाढली. रद्द झालेल्या रेल्वे गाड्या आणि प्रवाशांचा महापूर पाहून रेल्वे प्रशासन हबकून गेले होते. उपलब्ध रेल्वे गाड्यांमध्ये घुसण्यासाठी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की सुरू होती. यामुळे आबालवृद्धांचे हाल झाले. रेल्वे स्थानकावर उत्तर भारताकडे तसेच विदर्भाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा भरणा जास्त होता. "पुणे व पिंपरी चिंचवड भागात राज्याचा ग्रामीण भागातील कर्मचारी, कामगार व मजूर वर्ग मोठ्या आहेत. त्यातील निम्म्याहून जास्त लोक गेल्या ५-६ दिवसात गावाकडे परतले. गुरुवारी पिंपरीत पोलीस रस्त्यावर उतरल्यावर अस्वस्थ झालेला ग्रामीण वर्ग गावाकडे निघाला. यामुळे खासगी टुरिस्ट गाड्यांच्या भाड्यात दुपटीने वाढ झाली. पंतप्रधानांनी ‘जनता कर्फ्यु’ची घोषणा केल्यानंतर उरलेले हजारो लोक देखील मिळेल त्या साधनाने गावाकडे जाण्याची धडपड करीत आहेत," अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूत्रांनी दिली. पुण्यातील शिवाजी नगर बसस्थानकावर शनिवारी सकाळपासून प्रवाशांची झुंबड उडाली होती. तोंडला रुमाल, स्कार्फ, उपरणे, मास्क लावलेले महिला व पुरुष प्रवासी अस्वस्थ नजरेने गाड्या शोधत होते. यात मराठवाडा व विदर्भातील प्रवाशांची संख्या जास्त होती. एसटी महामंडळाच्या अनेक बसेस आगोदरच रद्द झालेल्या असताना प्रवाशांची गर्दी वाढल्याने एसटी आगारातील कर्मचारी प्रवाशांच्या रोषाला सामोरे जात होते. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तयारीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी (ता.२१) पुन्हा घेतला.दैनदिन मजूरीवर ज्यांची उपजिविका अवलंबून आहे, त्या कुटुंबाला तीन महिने धान्य पुरविले जाणार आहे. जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करण्यात येईल, त्यात खंड पडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com