लातूर, हिंगोली बाजारात कोट्यवधींची उलाढाल ठप्प

लातूर बाजारात कोट्यवधींची उलाढाल ठप्प
लातूर बाजारात कोट्यवधींची उलाढाल ठप्प

लातूर ः राज्य शासनाने माथाडी कायद्यात व बाजार समितीच्या कायद्यात मोडतोड केली आहे. याचा मोठा परिणाम माथाडी कामगारांवर होत आहे. त्यामुळे राज्यभर शासनाच्या विरोधात कामगारात असंतोष पसरला आहे. याचा परिणाम मंगळवारी (ता. २७) येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचा अडत बाजार कामगारांनी बंद ठेवला. यामुळे कोट्यवधीची उलाढाल ठप्प राहिली. बाजारात शुकशुकाट राहिला.

राज्य शासनाने माथाडी कायदा, बाजार समितीचा कायदा व कामगार चळवळ नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातून ता. २५ आक्टोबर रोजी राज्यपालांचा आदेशही काढण्यात आला आहे. हा आदेश कामगारांवर अन्यायकारक ठरणारा आहे. त्यामुळे कामगारात असंतोष पसरला आहे. त्यामुळे राज्यभरात कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वात बाजार बंदची हाक देण्यात आली होती. यात येथील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सध्या अडत बाजारात सोयाबीनची वीस हजार क्विंटल पेक्षा जास्त आवक आहे. आज बाजार बंद राहिल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल मात्र ठप्प राहिली. या आंदोलनात संचालक हर्षवर्धन सवई, ज्ञानोबा कांबळे, भानुदास कांबळे, कालिदास सावंत, बशीर शेख, गोविंद लहुबंदे, ज्ञानेश्वर कोकाटे, महादेव पालोळे, सतीश खंडागळे, बाबा धावारे, भाऊराव कांबळे, मधुकर गायकवाड, दीपक कोकाटे, भिमा धावारे, शेषेराव वाघमारे आदी सहभागी झाले होते.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बंद कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल मापाडी कामगारांनी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र मोंढा माथाडी कामगार आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता. २७) काम बंद आंदोलन केले. यामुळे हिंगोली बाजार समितीअंतर्गतच्या संत नामदेव हळद मार्केट, तसेच भुसार मार्केटमधील शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होते. दरम्यान, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. २७) शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदी सुरू होती, परंतु भुसार मालाची आवक नसल्यामुळे लिलाव झाले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद, जालना व बीडमध्ये व्यवहार ठप्प औरंगाबाद, जालना व बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार मंगळवारी (ता. २७) ठप्प होते. माथाडी व बाजार समिती कायद्याची शासन परस्पर मोडतोड करीत असून त्याविरूद्ध मंगळवारी राज्यव्यापी बंद आणि आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. माथाडी कामगार संघटनांनी एकजूटीने हा बंद व उपोषणाचा इशारा दिला होता. त्याचा थेट परिणाम औरंगाबाद, जालना व बीड येथील बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे जळपास सर्व व्यवहार ठप्प होण्यावर झाला. औरंगाबाद बाजार समितीमध्ये तूर्त मकाची होत असलेली आवक पाहता जवळपास पाच ते सहा लाखाचे व्यवहार ठप्प झाले होते. जालना बाजार समितीमध्ये दरदिवशी होणारी अडीच ते तीन कोटींची भुसार माल खरेदीची उलाढाल ठप्प झाली होती. बीड येथील जवळपास दहा ते पंधरा लाखाची होणार भूसार मालाची खरेदीही मंगळवारी ठप झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com