शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारा कायदा ः शेट्टी

पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही कायदा कराल, पण लक्षात ठेवा सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही. आमच्या हातात दगड आहेत व तुमच्या काचा आहेत. यामुळे जपून राहा, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला दिला.
Law that binds farmers to corporate bonds: Shetty
Law that binds farmers to corporate bonds: Shetty

कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही कायदा कराल, पण लक्षात ठेवा सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही. आमच्या हातात दगड आहेत व तुमच्या काचा आहेत. यामुळे जपून राहा, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला दिला.

राज्यसभेत मंजूर झालेला कायदा हा शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारा असून केंद्र सरकारने हा कायदा संमत करून चुकीचं केले आहे. सरकार हमीभावाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहत आहे. देशात कॉन्ट्रक्ट शेती असल्यास शेतकऱ्यांचे भले होईल, असे आभासी चित्र निर्माण केले जात आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या संघटना या विधेयकाचा यासाठीच विरोध करत आहेत.

अकाली दलासारखा ग्रामीण भागात वाढलेला पक्षही शेतकरी विरोधी कायदा आहे, म्हणून सत्तेतून बाहेर पडत आहे. यावरूनच या कायद्याला ग्रामीण भागातून किती विरोध आहे, हे दिसते. कॉर्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला बांधील नाहीत, मग यातून आमच्या शेतकऱ्यांना हमीभाव कसे मिळणार, याची कुठेही या कायद्यात तरतूद नाही. शेतकऱ्यांना यामधून काहीच मिळणार नाही, अशी टीका श्री. शेट्टी यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com