जांभुळणी तलावाच्या कालव्याला गळती

कालव्यास मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे पिकास पाणी वेळेवर मिळत नाही. कालवा तातडीने दुरुस्त करावा. - अशोक गावडे, लाभार्थी शेतकरी कालव्यातून पूर्णक्षमतेने पाणी मिळत नाही. कालवा दुरुस्ती व अस्तरीकरणासाठी गतवर्षी लघू पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव देण्यात आला. मात्र अद्याप काम झालेले नाही. कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरणाशिवाय शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. पाण्यावरून होत असलेली वादावादी थांबवण्यासाठी कालवा दुरुस्ती हाच पर्याय आहे. - संगीता मासाळ, सरपंच
जांभुळणी तलावाच्या कालव्याला गळती
जांभुळणी तलावाच्या कालव्याला गळती

खरसुंडी, जि. सांगली : जांभुळणी (ता. आटपाडी) येथील साठवण तलावाच्या कालव्याची लघू पाटबंधारे विभागाने ४८ वर्षांत दुरुस्ती केली नाही. कालव्यात उगवलेल्या झाडा-झुडपांमुळे पाण्याची गळती सुरू आहे. परिणामी, कालव्याचे पाणी गरजू शेतकऱ्यांना न मिळता वाया जात आहे. त्यामुळे कालवा दुरुस्तीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

आटपाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पहिला जांभुळणी साठवण तलाव आहे. त्याची पाणी साठवण क्षमता १०९.२६ दशलक्ष घनफूट आहे. तलावास अजिबात गळती नसल्यास वर्षभर पाणी टिकते.

चार गावांच्या पाणीपुरवठा योजना याच तलावातून आहेत. तलावास कालवा शेतीसाठी सन १९७२ साली पाटबंधारे विभागाने जांभुळणीच्या शेतकऱ्यांसाठी काढला. तो पूर्ण मातीचा आहे. त्यास अस्तरीकरण नाही. त्यामुळे झाडेझुडपे उगवली आहेत. आठ किलोमीटर लांबीच्या कालवा त्यामुळे दिसेनासा झाला आहे.  

‘‘पुढील आठवड्यात दुरुस्ती व अस्तरीकरणाबाबत प्रस्ताव तयार करणार आहे. तो अर्थसंकल्पात सादर केला जाईल.`` असे लघू पाटबंधारे अभियंता केंगार यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com