शेतकऱ्यांना किमान हमीभाव तातडीने द्यावा; साहित्य संमेलनात ठराव

शेतकऱ्यांना किमान हमीभाव तातडीने द्यावा; साहित्य संमेलनात ठराव
शेतकऱ्यांना किमान हमीभाव तातडीने द्यावा; साहित्य संमेलनात ठराव

उस्मानाबाद : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असून, केंद्र आणि राज्य सरकारची यासंदर्भातील अनास्था चिंताजनक आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची तातडीने खरेदी करून हमीभाव विनाविलंब द्यावा, अशी मागणी करीत मराठवाड्याला समन्यायी पाणी द्यावे, असा ठराव आज ९३व्या साहित्य संमेलनात करण्यात आला. उस्मानाबाद येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात समारोप प्रसंगी एकूण २० ठराव संमत करण्यात आले. शेतकऱ्यांच्या संदर्भात मांडलेल्या ठरावात म्हटले की, महाराष्ट्रातील शेतकरी समाजधुरिणांचा आणि जाणत्या मंडळींचा चिंतेचा विषय झाला आहे. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना त्यांच्या भवितव्याची चिंता वाटत आहे. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाची याबाबतीतील अनास्था चिंताजनक आहे. केंद्र आणि राज्य सरकारने संवेदनशीलतेने त्यांच्या प्रश्नांकडे पाहावे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची तातडीने खरेदी करून त्यांना जाहीर केलेला किमान हमी भाव विनाविलंब द्यावा. शेतकऱ्यांना शेतमाल उत्पादन निघाल्यापासून किमान चार महिन्यांत खरेदी करावा. त्यात खंड पडू नये. मराठवाडा प्रदेश दुष्काळग्रस्त आहे. या परिसरात कमी होणारा पाऊस, हे कारण असले तरी समन्यायी पाणीवाटपाच्या ठरावानुसार मराठवाड्याच्या हक्काचे २३ टक्के पाणी तातडीने मराठवाड्याला मिळावे, असा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान, मराठी साहित्य संमेलन भरविण्यावर बंदी घालण्यात आली म्हणून कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. याशिवाय, अन्य ठराव मंजूर करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com