जळगाव ः वाघूर नदीकाठी व शिवारातील टंचाई लक्षात घेता नदी व शक्य त्या भागातील पाटचारीत पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
वाघूर प्रकल्पाचा लाभ भुसावळ, जळगाव व जामनेर तालुक्याला होतो. पाटचारी जळगाव तालुक्यातील कोरडवाहू पट्ट्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आसोदा, भादली व लगत काळी कसदार जमीन आहे. या भागात पूर्वहंगामी कापसाची लागवड होवू शकते. त्यासाठी पाटचारीत नियोजनबद्धरित्या पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. तर, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे, वराडसीम, गोजोरा भागातही पाण्याची प्रतीक्षा आहे.
या भागात हलकी, मुरमाड जमीन आहे. वाघूर नदीतदेखील पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. या नदीचे पाणी साकेगाव (ता.भुसावळ) जवळ तापी नदीत जावून मिळते. या पाण्याचा उपयोग पुढे जळगाव, यावल तालुक्यातील नदीकाठच्या गावांना होवू शकतो. वाघूरमधून खरिपासाठी पाण्यासंबंधी पाटबंधारे विभागाने कार्यवाही हाती घेतली आहे. पाणी मागणीबाबत अर्जही मागविले होते. परंतु, पाणी पुढील आठवड्यात सोडले जाईल, अशी माहिती मिळाली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.