मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी सोमवारी (ता.२१) ९९ टक्क्यांवर मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणी २४ मे रोजी होत आहे. सहाही ठिकाणी अतिशय चुरशीने मतदान झाले. जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद, नगरपंचायत या संस्थांतील सुमारे ४ हजार ६२१ मतदार सदस्य मतदार होते. सर्वांचे लक्ष लागलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात ९९.९० टक्के मतदान झाले. भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अशोक जगदाळे यांच्यात ही लढत होत असून, या ठिकाणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदान टक्केवारी : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग - ९९.७९ टक्के, नाशिक- १०० टक्के, परभणी-हिंगोली -९९.६० टक्के, अमरावती - ९९.८० टक्के आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली - ७४.३१ टक्के
मतदार संघ आणि उमेदवार
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.