पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून मुंबईत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जेमतेम चार महिनेच शिल्लक असल्याने येणारे पावसाळी अधिवेशन राज्य सरकारसाठी महत्त्वाचे असणार आहे. १७ जूनपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राज्याचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर केला जाणार असून, त्यात घोषणांचा पाऊस पडणार असल्याची शक्‍यता आहे.

राज्याचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून मुंबईत होणार असल्याची अधिसूचना शुक्रवारी काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी भाजप-शिवसेना सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने या वेळी आकर्षक घोषणांचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. राज्यातला दुष्काळ, कर्जमाफी, धनगर आरक्षणासारख्या प्रश्‍नांना या अधिवेशनात राज्य सरकारला सामोरे जावे लागणार आहे.

या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पाच वर्षांचा लेखाजोखा सरकारला मांडता येणार आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची परंपरा मोडीत काढत गेल्या वर्षी सरकारमधील वरिष्ठ नेत्यांच्या हट्टापायी नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशनाचा घाट घालण्यात आला. हिवाळी अधिवेशनापेक्षा पावसाळी अधिवेशनाचा कालावधी मोठा असल्याने ऐन पावसाळ्यात सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून सर्वांचीच गेल्या वर्षी गैरसोय झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com