तेराव्या विधानसभेत पाच वर्षांत दररोजचे कामकाज तास सात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  ः राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जून ते २ जुलै असे १५ दिवस पार पडले. राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार असल्याने सध्याच्या भाजप सरकारच्या कार्यकाळातील हे अखेरचे अधिवेशन होते. तेराव्या विधानसभेची स्थापना २१ ऑक्‍टोबर २०१४ रोजी झाली. सभागृहाची पहिली बैठक ८ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आली. त्या दिवसापासून आजपर्यंत एकूण १८ अधिवेशने झालेली असून, सभागृहाच्या एकूण २२१ बैठका झाल्या. गेल्या पाच वर्षांत सभागृहाचे प्रत्यक्षात रोज सरासरी सात तास कामकाज झाले, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली. सत्र काळातील काम

  • एकूण बैठकांची संख्या : १२
  • प्रत्यक्षात झालेले कामकाज : १०० तास १६ मिनिटे
  • मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे वाया गेलेला वेळ : ३ तास ३७ मिनिटे
  • अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ : ३ तास ३७ मिनिटे
  • रोजचे सरासरी कामकाज :८ तास २० मिनिटे
  • तारांकित प्रश्‍न

  • एकूण प्रश्‍न : ८०२४
  • स्वीकृत प्रश्‍न : ७११
  • सभागृहात तोंडी विचारलेले प्रश्‍न : ५३
  • अल्प सूचना प्रश्न : ४
  • लक्षवेधी सूचना

  • प्राप्त सूचना : १८९०
  • मान्य झालेल्या सूचना : ८०
  • चर्चा झालेल्या सूचना : ४३
  • विशेष उल्लेख

  • प्राप्त सूचना : २५६
  • मांडलेल्या व पटलावर ठेवण्यात आलेल्या सूचना : १३८
  • अर्धा तास चर्चा

  • प्राप्त सूचना : १७३
  • स्वीकृत सूचना : ६८
  • सभागृहात सदस्यांची उपस्थिती (टक्‍क्‍यांमध्ये)

  • सरासरी : ७८.६४
  • जास्तीत जास्त : ८८.९३
  • कमीत कमी :४१.९७
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com