केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या दरावर परिणामाची शक्यता कमीच

केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेले दर, तसेच अशा स्थितीत निर्यातक देश एकतर निर्यातशुल्क वाढवितात किंवा व्यापारी दर वाढवून निर्यात करतात, असा आजवरचा अनुभव आहे.
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या दरावर परिणामाची शक्यता कमीच
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या दरावर परिणामाची शक्यता कमीच

पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेले दर, तसेच अशा स्थितीत निर्यातक देश एकतर निर्यातशुल्क वाढवितात किंवा व्यापारी दर वाढवून निर्यात करतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे दरावर जास्त परिणाम होईल असे वाटत नाही. तसेच नगण्य साठा, पावसाने होत असलेले नुकसान आणि उत्पादकतेवर झालेला परिणाम यामुळे सोयाबीन दरावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही, असे जाणकारांनी सांगितले. यंदा पेरणी लांबल्याने सोयाबीन आवकेचा हंगामही लांबला आहे. तरी देशातील काही बाजार समित्यांमध्ये लवकर लागवड झालेले सोयाबीन दाखल होत आहे. या सोयाबीनला चांगला दरही मिळत आहे. मात्र सरकारच्या निर्णयाने बाजारात संभ्रमाची स्थिती निर्माण केली आहे. मागील हंगामात तेजीला मुकलो मात्र या हंगामात तरी चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. मात्र जनुकीय सुधारित सोयापेंड आयातीला परवानगी, तसेच खाद्यतेल आयात शुल्कात कपात करून सरकार शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवते की काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. जाणकारांच्या मते या दोन्ही निर्णयाचा देशांतर्गत बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे. 

आंतरराष्ट्रीय भाववाढीची झळ देशाच्या एकूण गरजेपैकी जवळपास ७० टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरातील घडामोडींचा देशातील दरावर थेट परिणाम होतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव हे गेल्या वर्षीपेक्षा ७० ते ८० टक्क्यांनी वाढलेले आहेत. पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सरकारने देशातील भाववाढ रोखण्यासाठी आयातशुल्क कपात केली, असे जाणकारांनी सांगितले. या निर्णयाने देशांतर्गत बाजारात फार बदल होईल, अशी शक्यता नसल्याचे सांगण्यात आले.  जाणकार म्हणतात...

  • आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय सोयाबीनला मोठी मागणी
  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन अजूनही खातेय भाव
  • देशात शिल्लक साठा नसल्याने दराला आधार
  • अनेक ठिकाणी दुष्काळ, पूर, पावसाने नुकसान
  • नैसर्गिक आपत्तीने उत्पादकताही प्रभावित
  • शेतकऱ्यांनी बाजाराचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा
  • प्रतिक्रिया... खाद्यतेल आयातशुल्क कपातीचा सोयाबीन दरावर परिणाम होणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत आहे, तसेच हंगाम लांबल्याने मागणी आहे. तसेच पावसाने नुकसान होत असल्याचे वृत्त असल्याने दर मजबूत राहतील. शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता बाजाराचा अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा. - दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार विश्‍लेषक 

    खाद्य तेलाच्या आयात शुल्कात कपात केल्याने भारतातील खाद्य तेलाच्या भावावर जास्त परिणाम होताना दिसत नाही. साधारणपणे, भारताने आयात शुल्कात कपात केल्यावर मलेशिया आणि इंडोनेशिया निर्यात शुल्क वाढवतात. त्यामुळे भारतीय ग्राहकांना खाद्य तेलाच्या किमतीत दिलासा मिळताना दिसत नाही. पण या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना मात्र फटका बसतो.  - डी. एन. पाठक, कार्यकारी संचालक, सोपा

    सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. तेल बियाण्याच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे. पण या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमतीत ग्राहकांच्या पातळीवर जास्त परिणाम होताना दिसत नाही. भारताने आयात शुल्कात कपात केल्यावर निर्यातदार देश खाद्य तेलाच्या किमती वाढवतात. त्यामुळे आयात शुल्काने पाच रुपये कमी होणार असतील तर ग्राहकांपर्यंत एक दोन रुपयांचा फायदा पोहोचतो.   - बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, एसईए

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com