परभणी ः ‘‘शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून रेशीम कोषापासून धागा निर्मिती करण्यासाठी नाबार्ड बॅंकेकडे प्रकल्प सादर केल्यास जिल्ह्यात सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,’’ असे प्रतिपादन नाबार्डचे विभागीय व्यवस्थापक पी. एम. जंगम यांनी केले.
कृषी विभागाच्या ‘आत्मा’ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे पेठशिवणी (ता. पालम) येथे तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. पेठशिवणी येथील शेतकरी हरिभाऊ कंजाळकर यांच्या शेतावर आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनंतराव करंजे होते. या वेळी श्री. जंगम बोलत होते.
या वेळी नाबार्डचे विभागीय व्यवस्थापक पी. एम. जंगम, पालम पंचायत समितीचे सभापती प्रशांत वाडेवाले, माजी सरपंच विनायक वाडेवाले, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे आदींची उपस्थिती होती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.