नांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झाले आहेत. आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा अतिवृष्टी झाली. त्याचेही पंचनामे सुरू आहेत. पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. वेळप्रसंगी कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना मदत करू’’, असे आश्वासन मदतकार्य व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार दिले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत वडेट्टीवार यांनी रविवारी (ता. १८) नांदेड येथे शासकीय विश्रामगृहात आढावा घेतला. आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारला मदत करण्याची विनंती केली आहे. त्याबाबत त्यांना लेखीही कळविले आहे. आमच्या पातळीवर शेतकऱ्यांसाठी मदतीला तत्पर आहोत. राज्य शासनाचे सर्व मंत्री त्या-त्या जिल्ह्यातील शेतात जाऊन शेतकऱ्यांसमवेत मदतीसाठी उभे असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांच्यासमोर ठेवला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.