रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीला ‘ब्रेक’

रत्नागिरी : गेले चार दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी पुन्हा सुरुवात केली. अचानक आलेल्या पावसामुळे हळव्या भात कापणीला ‘ब्रेक’ लागला.
 Light rice harvest breaks in Ratnagiri district
Light rice harvest breaks in Ratnagiri district

रत्नागिरी  : गेले चार दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी पुन्हा सुरुवात केली.  अचानक आलेल्या पावसामुळे हळव्या भात कापणीला ‘ब्रेक’ लागला. पावसाच्या भितीमुळे अनेक शेतकरी कापणी करून लगेचच भात सुकवून सुरक्षित ठिकाणी ठेवत आहेत.

शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९.७७ मिमी पाऊस झाला. चार ते पाच दिवस जिल्ह्यात कडकडीत ऊन पडले. त्यामुळे कापणी वेगाने सुरु झाली. जिल्ह्यात १०० ते १०५ दिवसात तयार होणारी भात कापणी योग्य झाली आहेत. सुमारे २० हेक्टरवर ही शेती आहे. राजापूर तालुक्यात ८ हजार हेक्टर एकूण लागवडीपैकी सुमारे ५० टक्केपर्यंत कापणी पूर्ण झाली आहे. 

रत्नागिरी तालुक्यात सुमारे ७ हजार हेक्टरपैकी २० टक्के क्षेत्रात कापणी पूर्ण झाली. संगमेश्वरमध्येही वेगाने कामे सुरु आहेत.  उर्वरित तालुक्यात हा वेग कमी आहे. पावसाच्या भितीने शेतकरी सकाळी लवकर भात कापून दुपारी कडकडीत उन्हात सुकवून सायंकाळी झोडणी करत आहेत. भात कापून ठेवत नसल्याने या पावसात भात शेतीचे मोठे नुकसान झाले नाही.

काही ठिकाणी कापलेले भात पावसात भिजल्याचे प्रकार पुढे येत आहेत.  सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता असल्यामुळे कापणी थांबली आहे. असेच वातावरण राहिले, तर भात कापणी रखडण्याची शक्यता आहे. पाऊस पडला, तर मात्र तयार झालेले भात पडून नुकसान होईल, अशी भीती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com