यवतमाळ जिल्हा बॅंकेने केले परस्पर कर्जाचे पुनर्गठण

यवतमाळ जिल्हा बॅंकेने केले परस्पर कर्जाचे पुनर्गठण
यवतमाळ जिल्हा बॅंकेने केले परस्पर कर्जाचे पुनर्गठण

यवतमाळ ः यवतमाळ जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना न विचारताच त्यांच्या कर्जाचे पुनर्गठण केले. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच पुनर्गठण झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशा मागणीचे पत्र खासदार भावना गवळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.  आत्महत्याग्रस्त अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके बसत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देत त्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय महाविकास आघाडीकडून घेण्यात आला. मात्र, यवतमाळ जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता त्यांच्या कर्जाचे पुनर्गठण केले. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत.  राळेगाव येथील शेतकरी विनोद काकडे, विजय पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी याप्रकरणी खासदार भावना गवळी यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार एकट्या राळेगाव तालुक्‍यात २०१८-१९ मध्ये १३९६ शेतकऱ्यांच्या ४ कोटी ६० लाख ८८ हजार ५८५ रुपयांच्या कर्जाचे रुपांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जवळपास तीस हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे रूपांतरण करण्यात आल्याने हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांनी खासदार गवळी यांच्याकडे व्यक्‍त केली आहे.  दोषींवर कारवाई करा खासदार भावना गवळी यांनी शेतकऱ्यांच्या या तक्रारीची दखल घेत याप्रकरणी चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. त्याआधारे दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com