राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा हजार कोटींची कर्जमाफी

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील २५ लाख ७७ हजार खातेदारांना आत्तापर्यंत १६ हजार ६९० कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे.
balaseheb patil
balaseheb patil

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील २५ लाख ७७ हजार खातेदारांना आत्तापर्यंत १६ हजार ६९० कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी दिली. कर्जमाफीसाठी चालू वर्षात ७ हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या निधीतून यापूर्वी वितरित केलेला निधी वगळता १ हजार ३०६ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास बुधवारी (ता. ८) शासनाने मान्यता दिली आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेर पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना राज्यामध्ये लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला होता. या कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला आता गती देण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असेही सहकारमंत्री पाटील यांनी सांगितले  आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com