आठ जिल्ह्यांतील ९० हजारांवर शेतकरी राहणार वंचित?

शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक आहे. दिवसा आणि रात्री शेतकरी ऑनलाइन प्रक्रियेत व्यग्र राहत आहेत. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. दुसरीकडे पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याच्या मार्गदर्शनाकरितादेखील कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ उदासीन आहे. अशी अडकित्त्यात सापडल्याची अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. - मनीष जाधव, शेतकरी, वागद, ता. महागाव, जि. यवतमाळ
कर्जमाफी अर्ज प्रक्रिया
कर्जमाफी अर्ज प्रक्रिया

नागपूर : मुख्यमंत्र्यांचा गृह जिल्हा असलेल्या एकट्या नागपुरातच दहा हजारांवर शेतकरी विहित मुदतीत कर्जमाफीची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यास असमर्थ ठरणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यात ८५ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी आजवर ७५ हजारांवर शेतकऱ्यांनी या संदर्भाने ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली. उर्वरित शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गृह जिल्हा असलेला चंद्रपूर या सातही जिल्ह्यांत हा आकडा ८५ ते ९० हजारांपेक्षा अधिक असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

ग्रामीण भागातील आपले सरकार केंद्र; तसेच इतर केंद्रांवर लिंक न मिळणे, सर्व्हर डाउन या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना रात्र-रात्र जागावे लागते. त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांचे ‘थम’ (अंगठे) जुळत नाहीत. त्यामुळेदेखील शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्रशासनाकडून कर्जमाफीची प्रक्रिया सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती फार विदारक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com