टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार 

पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून दहशत पसरविणाऱ्या टोळधाडीवर येत्या दोन दिवसांत नियंत्रण मिळविण्यात येईल, असा विश्‍वास कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्‍त केला.
dada-bhuse
dada-bhuse

नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून दहशत पसरविणाऱ्या टोळधाडीवर येत्या दोन दिवसांत नियंत्रण मिळविण्यात येईल, असा विश्‍वास कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्‍त केला. त्याकरिता आवश्‍यक त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. 

राजस्थान, पंजाब त्यानंतर मध्यप्रदेशात दाखल झालेल्या टोळधाडीने २४ मे रोजी पूर्व विदर्भातील जिल्हयात शिरकाव केला. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्हयात टोळधाडीने संत्रा, मोसंबी, भाजीपाल्यासह कापणीच्या अवस्थेत असलेल्या धान पिकांचा देखील फडशा पाडला. दहा दिवसांपासून किडीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून होत आहे. मात्र त्यात अपेक्षीत यश मिळाले नाही. खरिपापूर्वी किडीला हुसकावण्यात यश न आल्यास खरीप हंगाम गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते की काय ? यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.  कृषीमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (ता.२) नागपुरात पोचत टोळधाड नियंत्रण कामाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी टोळधाडीवर येत्या दोन दिवसात नियंत्रण मिळविण्यात येईल, असा दावा केला. त्याकरिता ड्रोनचा पर्याय विचाराधीन आहे. परंतु असे करताना त्या भागातील पाण्याचे स्रोत, साठे तसेच इतर नैसर्गिक संसाधनांना काही हानी पोचते का ? याचाही विचार करावा लागणार आहे. त्याविषयीची तांत्रिक माहिती घेऊनच ड्रोनचा वापर केला जाईल. ड्रोनच नाही तर इतरही पर्यायाच्या माध्यमातून या किडीला हुसकावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये बियाणे, खताची मुबलकता आहे. त्यामुळे कोठेही काळाबाजार झाल्यास अशा व्यक्‍तींविरोधात कारवाईचा इशाराही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिला. 

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी प्रज्ञा गोळघाटे (भगत), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे उपस्थित होते. 

केंद्रीय कृषिमंत्र्याची घेणार भेट  पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही. निवडणुकीच्या कामामुळे शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्याचे काम प्रभावित झाले होते. काही शेतकऱ्यांची अनेक खाते होते. अशाप्रकारच्या अनेक अडचणी आल्या. त्रुटी दूर करण्यात आल्याने या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना दोन्ही हप्ते मिळावे याकरिता केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची लवकरच भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  नागपूर विभागात टोळधाडीचा मुक्‍काम  गेल्या दहा दिवसांपासून टोळधाड नागपूर विभागातील जिल्हयात वास्तव्यास असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मंगळवारी सावनेर तालुक्‍यातील मंगसा, पोहना, भोजापूर या शिवारात कृषी विभागाकडून या किडीला हुसकावण्याचे प्रयत्न झाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com