मोदींची हवा संपली; सभेला लोक येईनात ः धनंजय मुंडे

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

नगर   : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा संपली आहे. सोमवारी झालेल्या सभेला अवघे पंधरा हजार लोक आले होते. नगर लोकसभा मतदार संघात १९९१ ची पुनरावृत्ती होईल. आजोबांप्रमाणे नातू हरेल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  सांगितले. 

राष्ट्रवादी, काँग्रेस व आघाडीचे नगरमधील उमेदवार आमदार संग्राम जगताप, शिर्डी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर विजयी संकल्प मेळावा झाला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, अंकुश काकडे, आमदार अरुण जगताप, राहुल जगताप, वैभव पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदींसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की सोमवारी मोदींनी महाराष्ट्रात सभा घेतली. अवघे पंधरा हजार लोक होते. हवा संपलीय. पाच वर्षांच्या काळात काय दिलं हे तर सांगितलं नाहीच, उलट दुष्काळात मदतीबाबत, विकास, कर्जमाफी, कांदा दर यावर काहीही बोलले नाही. शरद पवार यांच्या बोटाला धरून राजकारण शिकल्याचे मान्य करणारे मोदी आता पवार यांच्यावर टीका करत आहेत. देशभरात विरोधकांचे गटबंधन केल्याने मोदींना पराभव दिसू लागला असून, त्यामुळे ते टीका करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com