मोदी सरकारने शेतकरी,गोरगरिबांना न्याय दिला : मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला  ः देशात मागील पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चौफेर विकास झाला. शेतकरी, गोरगरिबांना न्याय देण्याचे काम या सरकारने केले. जगाच्या नकाशावर एक कणखर नेतृत्व म्हणून भारताचा उदय झाला. त्यामुळे येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा विकासाची गाडी वेगाने धावण्यासाठी भाजपला संधी द्या. यासाठी स्थानिक उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री

भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. ११) येथील आंबेडकर मैदानावर मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. या वेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार विकास महात्मे, भाजप सरचिटणीस डॉ. संजय कुटे आदी उपस्थित होते.  

या वेळी श्री. फडणवीस म्हणाले, की काँग्रेसचे नेते आम्ही २००८ मध्ये कर्जमाफी करून ७२ हजार कोटी रुपये दिल्याचे सांगतात. मात्र, आता आमचे सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ७५ हजार कोटी रुपये केंद्राच्या माध्यमातून टाकणार आहे. भाजप सरकार आल्यानंतर शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन देणार आहे. शेतकऱ्याला एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी दिले जाईल. काही कारणांनी ते कर्ज जर त्याला फेडता आले नाही तर पुढील पाच वर्षांपर्यंत त्यावर कुठलेही व्याज लागणार नाही. या सरकारने गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १२२६ कोटी रुपये टाकले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com