खोटी स्वप्न दाखविणारे मोदी, शहा ही माणसं यापुढे नकोत ः राज ठाकरे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या काळात राज्यातील १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील १५१ तालुक्यांतील २४ हजार गावे दुष्काळग्रस्त आहेत. मग भाजप सरकारने पाणी या विषयावर काय काम केले, असा सवाल करत जनतेला खोटी स्वप्न दाखविणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही माणसं या पुढे नकोत. त्यांना देशाच्या राजकीय क्षितिजावरून बाजूला केले पाहिजे. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच केसाने गळा कापला, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी नांदेड येथे आयोजित जाहीर सभेत श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी बाळा नांदगावकर, जयप्रकाश बाविस्कर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अभिजित पानसे, जिल्हाध्यक्ष माॅन्टेसिंग जहागीरदार आदी उपस्थित होते.

श्री. ठाकरे पुढे म्हणाले, की महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाची निवडणूक लढवत नाही. एकही उमेदवार उभा नाही. इतर कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी ही सभा नाही. परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शहा या खोट बोलणाऱ्या जोडगोळीविरुद्ध आपला राग आहे. त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्रभर प्रचार करत आहोत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केवळ बोलण्याशिवाय काहीही केले नाही. महाराष्ट्रातील पाणी गुजरातला नेण्याचा घाट घातला आहे. 

भूजल पातळी खोल गेली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्याचे येत्या ५०-६० वर्षांत वाळवंट होईल. नोटा बंदीमुळे देशातील साडे चार ते पाच कोटी लोकांचे रोजगार गेले. शेतकरी आत्महत्या होत आहेत. ग्रामीण भागातील तरुण स्थलांतर करत आहेत. हेच का अच्छे दिन असा सवाल श्री. ठाकरे यांनी यावेळी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com