मोदी सरकार शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विरोधात ः जयंत पाटील  

जयंत पाटील
जयंत पाटील

परभणी : नरेंद्र मोदी सरकार देशातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विरोधात आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ टाकळी कुंभकर्ण (ता. परभणी) येथे रविवारी (ता. ७) आयोजित सभेत पाटील बोलत होते. या वेळी माजी राज्यमंत्री तथा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसेचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे, सुरेश देशमुख, राजेश विटेकर, स्वराजसिंह परिहार, किरण सोनटक्के आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात शेतीमालाचे दर कोसळले आहेत. दुष्काळग्रस्तांना मदत केली जात नाही. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शिवसेना जिल्ह्याच्या अधोगतीस कारणीभूत आहे. येथील खासदार संसदेत या भागातील प्रश्न मांडत नाहीत. त्यामुळे हा जिल्हा मागास राहिलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारास निवडून दिल्यास या जिल्ह्यात उद्योगव्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com