पीकविम्याचे पैसे उद्योगपतींच्या खिशात गेले : राहुल गांधी

राहुल गांधी
राहुल गांधी

नांदेड  : भाजप सरकारने पीकविम्यासाठी देशातील विविध जिल्हे उद्योगपतींना वाटून दिले आहेत. त्यामुळे पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांचे १० हजार कोटी रुपये उद्योगपतींच्या खिशात गेले. नैसर्गिक संकटात देखील शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई दिली जात नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या इंजिनातील पेट्रोल काढून ते अंबांनींना दिले. देशात अंबानींचे राज्य आहे, अशी टीका कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केली. 

नांदेड येथे कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. १५) सायंकाळी आयोजित जाहिर सभेत श्री. गांधी बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, नसीम खान, उमेदवार अशोक चव्हाण (नांदेड), सुभाष वानखेड (हिंगोली), मिलिंद कामत (लातूर), चंद्रकांत हांडोरे, अमर राजूरकर आदी उपस्थित होते. 

या वेळी श्री. गांधी म्हणाले, की नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाच्या विरोधातील लढाईचे नाटक केले. नोटाबंदीचा अनेकांना फटका बसला. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाच्या आधारभूत किमतीत वाढ आदी आश्वासने फोल ठरली. एकीकडे अब्जावधी रुपयांचे कर्ज घेतलेले उद्योगपती कर्जाची परतफेड न करता देशात मुक्तपणे फिरत आहे. अनेक जण देश सोडून जात आहेत. दुसरीकडे घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकलेल्या शेतक-यांना मात्र तुरुंगात पाठविले जात आहे. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. शेतमालाच्या आधारभूत किमतीत वाढ केली जाईल. अन्नप्रक्रिया उद्योग उभारणी केली जाईल. नुकसान झाल्यास पीकविमा परतावा दिला जाईल. अर्थात त्यासाठी आधीच नियोजन केले जाईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com