सिंधुदुर्ग : अतिवृष्टीमुळे २९ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे २९ हजार शेतकऱ्यांचे नुकसान
अतिवृष्टीमुळे २९ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ हजार ९३३ शेतकऱ्यांचे १६ कोटी ५९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने सुमारे ७ हजार ३९८ इतक्या क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे, असा अहवाल कृषी विभागाने शासनाकडे पाठविला आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात या वर्षी जुलैच्या अखेरीस, ऑगस्टच्या पहिल्या आणि अखेरच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे स्थावर मालमत्तांसह शेतीचे मोठे नुकसान झाले. दोडामार्गातील अनेक गावांतील बागायती वाहून गेल्या, तर खारेपाटण परिसरातील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली राहिली. त्यामुळे पिके कुजून गेली. अतिवृष्टीमुळे नारळ, सुपारी, ऊस, केळी, आंबा, काजू, आवळा, कोकम, सुपारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून अहवाल कृषी विभागाने शासनाकडे पाठविला आहे.

या वर्षी कोरडवाहू क्षेत्राखालील ५४ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी करण्यात आली होती. यातील ६ हजार ८४७ हेक्टर ३२ गुंठे क्षेत्रावरील शेतीचे १३ कोटी ९६ लाख ८६ हजार इतके नुकसान झाले आहे. सिचंनाखालील २५९ हेक्टर ५४ गुंठे क्षेत्रावरील बागायतीचे १० कोटी ५ लाख ११ हजार इतके नुकसान झाले आहे.

कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६००, तर सिंचनाखालील शेतीकरिता १३ हजार ५०० रुपये नुकसान निश्‍चित करण्यात आले आहे. या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती कृषी विभागाचे अरुण नातू यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com