रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे पाणथळ भागातील भातशेतीचे नुकसान होत आहे.
Loss of paddy cultivation in Ratnagiri district
Loss of paddy cultivation in Ratnagiri district

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे पाणथळ भागातील भातशेतीचे नुकसान होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील शिळ धरणाजवळील सांडव्या लगतचा डोंगर खचला आहे. त्यामुळे आंबा, काजूच्या ४० हून अधिक झाडांचे, तर मिरजोळे येथे जमीन खचल्यामुळे भात लागवडीखालील जमिनीला भेगा पडल्या आहेत.

जिल्ह्यात बुधवारी (ता. २०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ८९.८३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड ५३.७०, दापोली ५९.१०, खेड ८३.९०, गुहागर ७५.७०, चिपळूण ९७.५०, संगमेश्वर १२४.९०, रत्नागिरी ९८.२०, लांजा १३१.३०, राजापूर ८४.२० मि.मी नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी शिळ धरणाच्या सांडव्याजवळील काही भागात भूस्खलन झाडले. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे हा भाग धोकादायक ठरण्याची भीती आहे. 

तहसीलदार शशिकांत जाधव, सरपंच संदीप नाचणकर यांच्यासह पोलिस पाटील सोनिया कदम आणि ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. २०) घटनास्थळाची पाहणी केली. सांडव्यापासून दीडशे मीटर अंतरावरील बाजू खचली आहे. तेथील डोंगर खाली येत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुरवातीला आंब्याची चार झाडे उन्मळून पडली.

आतापर्यंत ३० ते ४० गुंठे भाग खचला आहे. आंबा, काजूच्या ४० कलमांचे नुकसान झाले.  हा भाग असाच कोसळत राहिला, तर डोंगरावरील बागेचे नुकसान होण्याची भीती आहे. मिरजोळे येथे नदीकिनारी पूर्वी खचलेल्या भागाजवळ भेगा पडलेल्या आहेत. तेथे काही शेतकऱ्यांची भात लागवड धोक्यात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com