उसाच्या नुकसानीमुळे गाळप हंगामावर परिणाम होणार
उसाच्या नुकसानीमुळे गाळप हंगामावर परिणाम होणार

उसाच्या नुकसानीमुळे गाळप हंगामावर परिणाम होणार

सातारा ः जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात आॅगस्टच्या सुरुवातीस झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध पिकांसह ऊस पिकांची मोठी हानी झाली आहे. कराड, पाटण तालुक्यांसह सातारा, जावळी, वाई तालुक्यांतील नदीकाठच्या ऊस पिके पाण्याखाली राहिल्याने ऊस कुजल्याने उत्पादन घट होणार आहे. परिणामी, आगामी ऊस गाळप हंगामात उसाचा तुटवडा भासणार असल्याने साखर उत्पादनात घट होणार आहे. 

अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या पुराने तसेच शेतात पाणी साचल्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत अपरिमित हानी झाली आहे. तीनही जिल्ह्यांत ऊस पीक मोठ्या प्रमाणात असल्याने या पिकास सर्वाधिक फटका आहे. महापूर आलेल्या व नदीकाठचा ऊस दहा ते १२ दिवस पाण्याखाली राहिले होते. यामुळे अनेक ठिकाणचा ऊस कुजण्याबरोबरच वाढीवर परिणाम झाला आहे. कराड व पाटण तालुक्यांत अनेक गावांत या महापुरामुळे हानी झाली आहे. या दोन तालुक्यांत पाच साखर कारखाने आहे. यामध्ये सह्याद्री, कृष्णा वगळता इतर सर्व कारखान्यांचे कार्यक्षेत्र स्थानिक कराड आणि पाटण तालुका असल्याने येथे कमी पडणार आहे. 

सर्व कारखान्यांची वार्षिक सर्वसाधारण सभेची तयारी सुरू असून, काही कारखान्यांचे मिल रोलर पूजन झाले आहे. हंगामाची तयारी सुरू असून, ऊसतोड मजुरांचे करार सुरू आहे. तसेच कारखान्यांचे अंतर्गत कामे सुरू आहेत. साखरेचे किमान विक्री मूल्यनिश्‍चिती तसेच निवडणुकामुळे उसाला पहिला हप्ता चांगला मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. हंगामाची तयारी सुरू असलीतरी ऊस मात्र कमी पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील साखर कारखाने या अगोदरही सातारा जिल्ह्यातील ऊस गाळपासाठी नेला जात होता. आता तर या दोन जिल्ह्यांतील ऊस खराब झाला असल्याने सातारा जिल्ह्यातून जास्त ऊस नेला जाण्याची शक्यता आहे. परिणामी गाळपाचे उद्दिष्ट गाळण्यासाठी उसाची पळवापळवी होणार आहे. 

निवडणुकांच्या अगोदर बिल मिळणार जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखानदार विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार असणार आहेत. निवडणुकीच्या इतर प्रचारावर ऊस बिल मुद्दा हा कळीचा ठरणार आहे. कोणी किती बिल दिले, इतरच्या तुलनेत कमी जास्त, ऊसतोड, मजुरांचे पगार आदी मुद्यावर प्रचार रंगणार आहे. मतदारांना खूष करण्यासाठी निवडणुकीअगोदर बिले जमा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना करता येणार निवड  उसाचे झालेले नुकसान तसेच लागवडीच्या क्षेत्रात झालेली घट यामुळे गाळपास ऊस कमी पडणार आहे. या हंगामात अनेक कारखानदार उसासाठी शेतकऱ्यांच्या दारात यावे लागणार आहे. यामुळे ऊस कोणत्या कारखान्यास द्यायचा हे शेतकऱ्यांना निवडता येणार आहे. आपल्या कारखान्यांला ऊस मिळावा यासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील कारखान्यांच्या तुलनेत जास्त दर द्यावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com