पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान

नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान
नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान

पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे विभागात सुमारे एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यापैकी विभागात सुमारे नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नात घट झाल्याने काही प्रमाणात भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते.

पुणे विभागात जोरदार पावसामुळे मेथी, वांगे, पालक, कोथिंबीर, भेंडी, टोमॅटो अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विभागात सांगली जिल्ह्यात एकूण ६५ हजार २६७ हेक्टर, सोलापूर जिल्ह्यात ३६ हजार ३४५ हेक्टर, पुणे जिल्ह्यात २१ हजार ६८० हेक्टर, सातारा जिल्ह्यात ११ हजार ८०० हेक्टर व कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार ५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये भाजीपाला पिकांचाही समावेश असून, त्यांचे नुकसान झाले आहे.

पुणे विभागात एकूण ५१ तालुके बाधित असून, एकूण एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील काही भागातील गावांना भेटी देत आहेत. मात्र, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होऊन याकडे प्रशासन विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. 

पावसामुळे झालेले नुकसानीचे क्षेत्र कमी दिसत असले, तरी गेल्या महिन्यात झालेल्या सांगली, कोल्हापूर, सातारा भागात झालेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याने विभागात झालेले एकूणच दोन महिन्यांत झालेले नुकसानीचे क्षेत्र हे मोठे आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दरात वाढ झाल्याचे दिसून येते.

अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे म्हणाले की, गेल्या दोन ते तीन महिन्यांत झालेल्या सलग पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, बटाटा या पिकांचे मोठे क्षेत्र आहे. याशिवाय मेथी, कोथिंबीर, शेपू, भेंडी, वांगे, कारले या पिकांचेही चांगलेच नुकसान झाले. नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या फवारणीचा खर्च वाढला असून मागील काही महिन्यांपासून भाजीपाल्याच्या उत्पन्नात घट झाली आहे.

माझ्याकडे पाच एकर शेती आहे. त्यामध्ये एक एकरावर मिरचीची दोन महिन्यांपूर्वी लागवड केली होती. पावसामुळे या मिरचीचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच उसाचेही मोठे नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी उसाचे पंचनामे केले. मात्र, मिरचीचे पंचनामे केले नाही. त्यामुळे दैनंदिन खर्चासाठी लागणारा आर्थिक खर्चाचे ताळमेळ बसेना. - प्रल्हाद वरे, शेतकरी, मळद, ता. बारामती, जि. पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com