साताऱ्यातील प्रमुख धरणांत कमी पाणीसाठा

साताऱ्यातील प्रमुख धरणांत कमी पाणीसाठा
साताऱ्यातील प्रमुख धरणांत कमी पाणीसाठा

सातारा ः कमी पर्जन्यमानाचा जिल्ह्यातील प्रमुख धरणांवर दिसू लागला आहे. सर्व प्रमुख धरणांत पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होऊ लागल्याने धरणातील पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. 

कोयना राज्यासाठी लागणारी वीजनिर्मिती; तसेच जलसिंचनासाठी कोयना धरण सर्वांत महत्त्वाचे आहे. या धरणात ४९.२३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. सांगली जिल्ह्यात टंचाई कमी करण्यासाठी या धरणातून शुक्रवारपासून पाणी सोडले जात आहे. यामुळे या धरणातून वीजनिर्मिती तसेच टंचाईसाठी करावा लागणारा पाणीपुरवठा याचे नियोजन करावे लागणार आहे. 

कोयना धरणाप्रमाणे इतर धरणांतही पाणीसाठा कमी शिल्लक आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांसाठी महत्त्वाचे असलेल्या उरमोडी धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे. या धरणात २.६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. अजूनही किमानी दोन महिने या धरणातील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. धरणाच्या टक्केवारी विचार करता कोयना धरणात ४९.१७ टक्के, धोम धरणात १६.८१ टक्के, कण्हेर धरणात ३६.५२ टक्के, उरमोडी धरणात २७.१६ टक्के तारळी धरणात ४९.११, धोम-बलकवडी धरणात २३.९१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.   

प्रमुख धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये  कोयना - ४९.२३,  धोम-१.९६, उरमोडी-२.६२, कण्हेर-३.५०, धोम-बलकवडी-०.९५, तारळी- २.८६.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com