देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या महाराष्ट्रातून निर्यात

देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ जवळ निम्मी साखर यंदा महाराष्ट्रातील कारखाने निर्यात करत आहेत. देशात आतापर्यंत निर्यात झालेल्या साखरेपैकी ४१ टक्के साखर एकट्या महाराष्ट्रातून निर्यात झाली आहे.
Maharashtra alone exports half of the country's sugar
Maharashtra alone exports half of the country's sugar

कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ जवळ निम्मी साखर यंदा महाराष्ट्रातील कारखाने निर्यात करत आहेत. देशात आतापर्यंत निर्यात झालेल्या साखरेपैकी ४१ टक्के साखर एकट्या महाराष्ट्रातून निर्यात झाली आहे. या खालोखाल उत्तर प्रदेशने २९ टक्के साखरनिर्यात केली आहे. कर्नाटकातून ११ टक्के निर्यात विविध देशांना झाली आहे.

यंदा डिसेंबरमध्ये साखर निर्यात धोरण जाहीर झाले. ६० लाख टन निर्यातीस केंद्राने परवानगी दिली. यंदाच्या योजनेत केंद्राने एक चांगला बदल या योजनेत केला. कारखान्यांनी स्थानिक व आंतरराष्ट्रीय कोट्याच्या साखरेची आपापसांत अदलाबदल करण्याची मुभा दिली. ज्या कारखान्यांची साखर स्थानिक बाजारपेठेत जात नव्हती. त्यांना इतर कारखान्यांचा निर्यात कोटा या योजनेतून मिळाला. तर निर्यात न होणाऱ्या कारखान्यांना इतर कारखान्यांना स्थानिक कोटा मिळाला. याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना झाला. या बदलानंतर पहिल्या महिन्यातच राज्यातील साखर कारखान्यांनी ५ लाख टनांपर्यंत साखर निर्यात केली. केंद्राकडून सातत्याने यामध्ये लवचिकता आणली. यामुळे एप्रिल अखेरपर्यंत देशातून निर्यात झालेल्या साखरेपैकी ४१ टक्के साखर राज्यातून निर्यात झाली आहे.

एप्रिल अखेरपर्यंत महाराष्ट्रातून पंचवीस लाख टन साखरेचे करार झाले आहेत. यापैकी वीस लाख टन साखरनिर्यात झाली आहे. केंद्राने ३० एप्रिलला निर्यातीचा आढावा घेऊन कोटा अदलाबदल योजनेअंतर्गत महाराष्ट्राला ६ लाख मेट्रिक टनांचा अतिरिक्त कोटा दिला आहे.

महाराष्ट्राला सोईस्कर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला साखर निर्यात करणे सुलभ आहे. सध्या जयगड पोर्ट (रत्नागिरी) व मुंबईच्या दोन बंदरांतून राज्याची साखर बाहेर निर्यात होते. गुजरात बंदरामार्फतही राज्याची साखर बाहेर जाऊ शकते. इतर राज्यांना बंदरांची उपलब्धता एक तर लांब किंवा खर्चिक असल्याने महाराष्ट्रातील साखर इतरांच्या तुलनेत जलद बंदरापर्यंत पोहोचून निर्यात होऊ शकते. यामुळे नजीकच्या काळातही राज्यांतून अधिकची साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर तेजीत येत आहेत, जेवढी म्हणून साखर देशाबाहेर जाईल तितका फायदा साखर कारखान्यांना होणार असल्याने कारखान्यांनी येथून पुढील काळात ही निर्यातीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. सध्या केंद्राने दिलेल्या उद्दिष्ट एवढे करारही होण्याची शक्यता वाढली असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

येथून पुढील काळात निर्यात कोटा देताना महाराष्ट्राला अधिक कोटा देण्याची गरज आहे. असे झाल्यास राज्यातील कारखान्यांना प्रोत्साहन मिळून जास्तीत जास्त साखर देशाबाहेर जाईल व त्याचा फायदा स्थानिक बाजारपेठेत साखरेचा बोजा कमी होण्यावर होईल. - अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com