शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक प्रयत्न हवेत : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंतप्रधान मोदी यांचे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज आहे. दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन यांच्या साथीनेच शेती शाश्वत होण्यासह शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्‍चितपणे  वाढ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘द कंपाउंड लाइव्हस्टोक फीड मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (सीएलएफएमए) सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, तेलंगणाचे वित्तमंत्री इतेला राजेंदर, केंद्रीय पदुम सचिव देवेंद्र चौधरी, ‘सीएलएफएमए’चे अध्यक्ष बी. सुंदरराजन आदी उपस्थित होते. यावेळी असोशिएशनशी संलग्न आणि उत्कृष्ट कार्य केलेल्या कंपन्यांना तसेच पशुखाद्य, कुक्कुटखाद्य आदी क्षेत्रासाठी आवश्‍यक औषध निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आले.

डेअरीसाठी दहा हजार कोटी ः कृषिमंत्री सिंह देशात गेल्या वर्षी ५ लाख शेततळी निर्माण करण्यात आली. या वर्षी ५ लाख याप्रमाणे एकूण १० लाख शेततळी निर्माण होत असून, यामुळे शेतीबरोबरच मत्यव्यवसायालाही चालना मिळाली आहे. डेअरी विकासासाठी महाराष्ट्राला १० हजार ८८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री सिंह यांनी या वेळी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com