...अन् तामिळनाडूत महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांना अवघ्या तासात मदत मिळाली !

नवी दिल्ली : पोटाची खळगी भरण्यासाठी थेट तामिळनाडूतल्या त्रिचीमध्ये जाऊन पोहोचलेल्या मराठवाड्यातील ऊसतोडणी मजुरांचे कोरोनाच्या संचारबंदीमुळे आणि भाषेच्या अडचणीमुळे चांगलेच हाल झाले होते. परंतु, तामिळनाडू प्रशासनातील मराठी अधिकाऱ्यांच्या तत्परतेने या मजुरांना अवघ्या तासाभरात अन्नधान्याची मदत मिळाली. परभणीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांची यात महत्त्वाची भूमिका राहिली.
...अन् तामिळनाडूत महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांना अवघ्या तासात मदत मिळाली !
...अन् तामिळनाडूत महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांना अवघ्या तासात मदत मिळाली !

नवी दिल्ली : पोटाची खळगी भरण्यासाठी थेट तामिळनाडूतल्या त्रिचीमध्ये जाऊन पोहोचलेल्या मराठवाड्यातील ऊसतोडणी मजुरांचे कोरोनाच्या संचारबंदीमुळे आणि भाषेच्या अडचणीमुळे चांगलेच हाल झाले होते. परंतु, तामिळनाडू प्रशासनातील मराठी अधिकाऱ्यांच्या तत्परतेने या मजुरांना अवघ्या तासाभरात अन्नधान्याची मदत मिळाली. परभणीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांची यात महत्त्वाची भूमिका राहिली. ऊसतोडणी मजुरांच्या टोळीचे मुकादम अंकुश आडे ६० मजुरांना समवेत कोठारी साखर कारखान्याचा ऊस तोडण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील लालगुडी तालुक्यात आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या मजुरांची अडचण सुरू झाली. कारखान्याकडून सुरवातचीचे पाचच दिवस मदत मिळाली. नंतर जवळचा शिधाही संपायला आला होता. त्यात भाषेची अडचण असल्याने अन्न कोठून मिळवावे हा प्रश्न होता. मुकादम आडेंनी परभणीत संपर्क साधला. हा विषय परभणीतील जिल्हा मदत केंद्रापर्यंत आणि परभणीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तामिळनाडूमध्ये अडकलेल्या या मजुरांच्या मदतीसाठी हालचाल सुरू झाली. ही मदत पोहोचविण्यात तामिळनाडू प्रशासनातील सनदी मराठी अधिकारी आनंद पाटील हे दुवा ठरले. आनंद पाटील यांनी ही माहिती तामिळनाडूतील आणखी एक मराठी प्रशासकीय अधिकारी अन्न व नागरी पुरवठा प्रशासनाचे आयुक्त असलेले सज्जन चव्हाण यांना दिली. आयुक्त चव्हाण यांनीही प्रशासकीय यंत्रणेचे चक्र वेगाने फिरवून लालगुडीच्या तहसीलदारांना या मजुरांपर्यंत धान्य पोहोचविण्याचे आदेश दिले. या आदेशापाठोपाठ लालगुडीच्या तहसीलदारांनी अवघ्या एका तासात स्वतः जाऊन या साठ मजुरांना १०० किलो तांदूळ, २५ किलो गहू आणि पाच किलो तूर डाळ असा धान्यसाठा दिला आणि या ऊसतोडणी मजुरांच्या पोटात अन्नाचा घास पडला. महाराष्ट्रातील साखर कारखाने केवळ ४५ दिवस चालले. त्यामुळे राज्यात काम नसल्याने कामासाठी ऊस तोडणी मजूर तामिळनाडूपर्यंत पोहोचले. या साठ जणांव्यतिरिक्त बीड, परभणी जिल्ह्यातील जिल्ह्यातील गंगाखेड, परळी, जिंतूर या आणखी २५० ते ३०० ऊस तोडणी मजूर (१३ ते १४ टोळ्या) तामिळनाडूमध्ये आहेत. याच भागात आहे. मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. लालगुडी तालुक्यात अडकलेल्या गंगाखेडच्या ऊसतोडणी मजुरांची समस्या कळल्यानंतर मदतीसाठी तिरुचिरापल्ली जिल्हाप्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भाषेची अडचणीमुळे नेमकी माहिती समजावून सांगता येत नव्हती. तामिळनाडूतील सचिव आनंद पाटील यांच्या कानावर विषय घातल्यानंतर मदतकार्य वेगाने झाले. — अरविंद लोखंडे,  उपविभागीय अधिकारी, परभणी  परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सांगून लालगुडीच्या तहसीलदारांना तेथे पाठवले. ज्याप्रमाणे तिरुचिरापल्लीत मराठवाड्यातील ऊसतोड मजूर आहेत, तसेच कोईम्बतूर जिल्ह्यातही बिहारी मजूर आहेत. त्यांनाही प्रशासनातर्फे मदत केली जात आहे. बाहेरील राज्यातील लोकांना भाषेची अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील मदत केंद्रामध्ये हिंदी येणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जाणीवपूर्वक नेमणूक करण्यात आली आहे.  — सज्जन चव्हाण,  अन्न व नागरी पुरवठा आयुक्त

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com