सातारा जिल्ह्यात ४९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

सातारा जिल्ह्यात टॅंकरव्दारे पाणीपुरवठा
सातारा जिल्ह्यात टॅंकरव्दारे पाणीपुरवठा

सातारा : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तरीदेखील अनेक गावांना टॅंकरच्या पाण्यावर अवंलबून राहावे लागत आहे. माण, खटाव, कोरेगाव व फलटण या चार तालुक्‍यांतील ७२ गावे, २९२ वाड्या-वस्त्यांना ४९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

चार दिवसांपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र पाणीटंचाई असलेल्या भागांत पावसाचे प्रमाण कमी आहे. परिणामी पाणीटंचाई कमी झाली नसून, टॅंकरच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

माण, खटाव, कोरेगाव व फलटण या दुष्काळी तालुक्‍यांत टॅंकर सुरू आहेत. या चार तालुक्‍यांतील ७२ गावे २९२ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख सात हजार ४६ लोकसंख्येस ४९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये माण तालुक्‍यातील २२ गावे व १११ वाड्या-वस्त्यांना २२, खटाव तालुक्‍यातील १४ गावे ३६ वाड्या-वस्त्यांना सात, कोरेगाव तालुक्‍यातील २३ गावांना १२, फलटण तालुक्‍यातील ८ गावे व ४५ वाड्या-वस्त्यांना आठ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅंकर सुरू असलेल्या गावांत पाऊस नसल्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून टॅंकरची संख्या स्थिर आहे.

जिल्ह्यातील ५० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ७, खटावमधील २५, कोरेगावमधील १५, फलटणमधील ३ विहिरींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com