`महारयत`कडून सोलापुरात ५०० लोकांची फसवणूक

कडकनाथ
कडकनाथ

सोलापूर : राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीच्या कुक्कुटपालन व्यवसायातून फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. महारयत ॲग्रो कंपनीने सोलापूर जिल्ह्यातीलही पाचशे शेतकऱ्यांची दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केला.  सोलापूर जिल्ह्यातही महारयत ॲग्रो कंपनीवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शनिवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती चंदनशिवे यांनी दिली. शनिवारी सकाळी ११ वाजता चार हुतात्मा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, पंढरपूर या तालुक्‍यांसह जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांची महारयत ॲग्रो कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप या वेळी करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत पीडित शेतकऱ्यांनाच हजर करण्यात आले होते. महारयत ॲग्रो कंपनीच्या वतीने कुक्कुटपालनासाठी शेतकऱ्यांना करारबद्ध करण्यात आले आहे. करारात ठरलेल्या अटीनुसार कंपनी व्यवहार करत नसल्याचा आरोप या वेळी पीडित शेतकऱ्यांनी केला. या पत्रकार परिषदेला नगरसेवक गणेश पुजारी यांच्यासह पीडित शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com