राज्यात महायुतीचे सरकार येणार म्हणजे येणार : उद्धव ठाकरे

राज्यात महायुतीचे सरकार येणार म्हणजे येणार : उद्धव ठाकरे
राज्यात महायुतीचे सरकार येणार म्हणजे येणार : उद्धव ठाकरे

मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार येणार म्हणजे येणार हे निश्चित आहे. कामगार नेते नरेंद्र पाटील यांना खासदार करण्याचे स्वप्न पूर्ण करणार, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.

अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त नवी मुंबईत बुधवारी (ता. २५) झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व श्री. ठाकरे एकत्र आले होते. युतीची घोषणा होण्यापूर्वी या कार्यक्रमात दोघे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी फडणवीस आणि ठाकरे यांनी महायुतीच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे युती होणार हे निश्चित मानले जात आहे.

श्री. ठाकरे म्हणाले, की कष्टकऱ्यांचे सरकार आले पाहिजे. कामगारांशी प्रामाणिक राहणारे नेते हवेत. सुडाचे राजकारण कधी आम्ही केले नाही आणि करणारही नाही. पुढील सरकार युतीचेच असेल. नेतृत्व चुकले तर कामगार देशोधडीला लागतो. माथाडींमध्ये संघर्षाचा आत्मविश्वास जागविला पाहिजे.

माथाडी कामगारांच्या घरांसाठी सर्वांगीण प्रयत्न करण्यात येतील. पंतप्रधान आवास योजनेतून त्यांना मदत केली जाईल. सिडकोच्या माध्यमातून घरे देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे दिले.

आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही ः फडणवीस ईडीचे कामकाज राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही, त्यामुळे राज्य सरकार ईडीच्या कारवाईत हस्तक्षेप करणार नाही. आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com