'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम ठेवा'

थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम ठेवा
थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम ठेवा

सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय रद्द करून सदस्यांतून सरपंच निवड करण्यासाठी घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे, तो तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. सरपंच परिषदेने सोलापुरात नुकतेच मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी निवेदन देऊन ही मागणी केली.  सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढून सरकारच्या या एकतर्फी निर्णयाचा निषेध करण्यात आला. सात रस्ता चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी दत्ता काकडे यांनी सांगितले, की सरपंच व लोकभावना ही थेट जनतेतून सरपंच निवडीच्या बाजूने आहे. राज्यात त्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जातो आहे, शासनाने याचा विचार करावा, अन्यथा आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू. आमची मागणी, त्यामागचा उद्देश लक्षात घ्या, हीच आमची अपेक्षा आहे. सरचिटणीस ॲड. जाधव म्हणाले, "सरकारने निर्णयाआधी काहीच विचार केला नाही, अत्यंत घाईगडबडीत हा निर्णय घेतला गेला.'' या वेळी जिल्हा अध्यक्ष अदिनाथ देशमुख, महिलाध्यक्ष कविता घोडके-पाटील, सतीश नीळ, किशोर पाटील, अमोल दुरंदे, विक्रांत काकडे, पंडित मिरगणे, स्मिता पाटील, काका फफाळ, विकास माने, यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख सरपंच, उपसरपंच बहुसंख्येने उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com