काजू उत्पादकांना नुकसान भरपाई द्या

काजू उत्पादकांना नुकसान भरपाई द्या
काजू उत्पादकांना नुकसान भरपाई द्या

आजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यातील बहुतांश शेतकरी काजूचे उत्पादन घेतात. यातून शेतकऱ्यांना आर्थिक लागते. यंदा काजू उत्पादनात कमालीची घट आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याला आधार देण्यासाठी शासनाने काजू उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चितळे, जेऊर, भावेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. आजऱ्याचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, काजू, बांबू, ऊस या पिकांवर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण चालते. उसाबरोबर नगदी पिकामध्ये काजूचा समावेश केला आहे. मात्र यंदा काजू उत्पादन पूर्णतः घटले आहे. काही शेतकऱ्यांचे अगदी एक टक्‍क्‍यावर आले आहे. तर काहींचे दहा टक्केपर्यंत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. सन २०१८ मध्ये जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने काजूची झाडांची मर झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जानेवारी २०१९ पासून ढगाळ वातावरण, लांबलेली थंडी यामुळे काजूचा मोहोर करपल्याने नुकसान झाले.

झाडांची गणती, स्थळ पंचनामे करा काजू झाडांची गणती करून शेतकऱ्यांच्या पिकांचे स्थळ पंचनामे करावेत व जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना ऊस, काजू पिकातून आर्थिक प्राप्ती झालेली नाही. त्यामुळे कर्ज भरणे अशक्‍यप्राप्त झाले आहे. यंदा शासनाने पीक कर्ज माफ करावे. याची दखल न घेतल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल. वन्यप्राणी व अन्य गोष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यात काजू उत्पादनात घट झाल्याने आणखी भर पडली आहे. त्यामुळे तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com