कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा : घनवट

कृषी कायद्यांसंदर्भातीलसर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवालन्यायालयाने सार्वजनिक करावा, अशी विनंती या समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी केली आहे.
Anil_Ghanwat_1.jpg
Anil_Ghanwat_1.jpg

अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना विरोध दर्शवीत दिल्लीच्या रस्त्यांवर गेल्या १० महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या कायद्यांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल सादर झालेला असून, न्यायालयाने हा अहवाल सार्वजनिक करावा. तसेच पुढील चर्चा व कारवाईसाठी केंद्र सरकारकडे सुपूर्द करावा अशी विनंती या समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी केली आहे.  याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणारे पत्र लिहिले आहे. याबाबत बोलताना श्री. घनवट म्हणाले, ‘‘दिल्लीच्या सीमांवर सध्या हजारो शेतकरी आंदोलन करीत आहेत. हे आंदोलक शेतकरी असून, आपण शेतकरी नेता असल्याने मनाला त्यामुळे वेदना होत आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुटले पाहिजे, अशी आपली भूमिका आहे.’’ ‘‘कृषी कायद्यांच्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या समितीने आपला अहवाल १९ मार्चला सादर केला आहे. या अहवाल गुप्त स्वरूपात आहे. आम्ही शेतकरी, बाजार समित्या, निर्यातदार व इतर विविध घटकांशी चर्चा करून त्यात शिफारशी केलेल्या आहेत. या अहवालावर चर्चा व्हायला. त्यात काही दुरुस्‍त्या हव्या असतील तर त्याही केल्या जाव्यात. मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने तातडीने निर्णय होऊन आंदोलन सुटले पाहिजे, असे वाटते. त्यासाठीच आपण सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून विनंती केली आहे,’’ असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com