ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार धास्तावले 

जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, थंड वारेही वाहत आहे. पावसाळी वातावरण तयार झाल्यामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार धास्तावले आहेत.
mango tree
mango tree

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, थंड वारेही वाहत आहे. पावसाळी वातावरण तयार झाल्यामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार धास्तावले आहेत.  जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२७) सायंकाळपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्या सोबतच जोरदार वारे वाहू लागले. विशेष म्हणजे या हवेत गारवा देखील होता. त्यामुळे पाऊस पडण्याची, शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान शनिवार (ता. २८) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. वाऱ्याचा वेग ही वाढला आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत. 

जिल्ह्यात सध्या आंबा, काजूच्या झाडांना पालवी, मोहोर येण्याची प्रकिया सुरू आहे. देवगड, मालवण, वेंगुर्ला, किनारपट्टीच्या तालुक्यातील अधिकतर आंब्याच्या झाडांना मोहोर आला आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे हापूसवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काजुला देखील पालवी आणि किरकोळ झाडांना मोहोर येण्यास सुरवात झाली आहे. त्यातच आता ढगाळ वातावरण तयार झाल्याने काजूवर कीड रोग वाढण्याची शक्यता आहे. या पूर्वीच काजूवर ढेकण्या, फांदीमर, या सारख्या कीड रोगांचा प्रार्दुभाव वाढल्याने बागायतदार हैराण झाले आहेत.कीड नियत्रंणासाठी विविध कीटकनाशकांच्या फवारण्या करून बागायतदारांनी खडतर प्रयत्नांनी बागांची पालवी आणि मोहोर टिकविला होता. परंतु आता पुन्हा ढगाळ वातावरण आणि पावसाचे सावट निर्माण झाल्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा सर्वाधिक फटका सह्याद्री पट्ट्यातील काजू बागांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागात वाऱ्याचा वेग अधिक आहे.  ढग, वाहणारे वारे अन् गारठाही  जिल्ह्यात वातावरणात विचित्र बदल जाणवत आहे. वारा सुटल्यानंतर सर्वत्र थंडीचे प्रमाण कमी होते. परंतु सध्या सोसाट्याचा वारा वाहत असूनही हवेत गारवा ही आहे. अशी स्थिती क्वचितच निर्माण होते. त्यामुळे ही स्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली, असा प्रश्न लोकांना पडला आहे. 

प्रतिक्रिया अरबी समुद्रात आणि दक्षिणेला समुद्रात निर्माण झालेल्या दोन्ही चक्रीवादळाचा कोणताही धोका कोकण विभागाला नाही. ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. 

- डॉ. यशवंत मुठाळ, ग्रामीण कृषी मौसम सेवा उद्यानविद्या, मुळदे, कुडाळ, 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com