सिंधुदुर्ग: भटवाडी येथे वणव्यात आंबा, काजू खाक 

जिल्ह्यातील आंबेगाव (ता. सांवतवाडी) भटवाडी येथे जंगलात लागलेल्या आगीत माधवी एकनाथ नाईक यांची आंबा, काजू आणि बांबूची दोनशेहून अधिक झाडे जळाली.
सिंधुदुर्ग: भटवाडी येथे वणव्यात आंबा, काजू खाक 
सिंधुदुर्ग: भटवाडी येथे वणव्यात आंबा, काजू खाक 

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आंबेगाव (ता. सांवतवाडी) भटवाडी येथे जंगलात लागलेल्या आगीत माधवी एकनाथ नाईक यांची आंबा, काजू आणि बांबूची दोनशेहून अधिक झाडे जळाली. त्यांचे सुमारे तीन लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

माधवी नाईक यांची आंबेगाव भटवाडी येथे आंबा, काजूची बाग आहे. याशिवाय त्यांनी मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची बाग असलेल्या जंगलाला आग लागली. मोठ्या प्रमाणात असलेले गवत आणि कडक उन्हाळा यामुळे आगीचा भडका उडाला. ही आग नाईक यांच्या आंबा, काजू बागेमध्ये घुसली. बागेला आग लागल्याचे समजताच नाईक यांनी आजूबाजूच्या लोकांना घेवुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीत बागेतील बहुतांशी झाडे खाक झाली. उत्पादनक्षम काजूची दीडशे तर आंब्याची ५० झाडे पूर्णपणे जळाली. याशिवाय बांबुचीही बेटे देखील भस्मसात झाली त्यांचे सुमारे तीन लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. 

पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर गेल्या काही दिवसांत बागांना आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वणव्यांमध्ये जळलेल्या बागांना नुकसान भरपाई देखील मिळत नाही. त्यामुळे या वणव्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com