सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील देवसु कुंभेश्वर (ता. सांवतवाडी) येथील डॉ. लवु सांवत यांच्या आंबा, काजू बागेला मंगळवारी (ता. ५) दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत दीड हजारांहून अधिक झाडे जळून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
श्री. सांवत यांची देवसु कुंभेश्वर पलिकडची वाडी येथे आंबा, काजू, बांबू व इतर झाडांची बाग आहे. या बागेला मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे अंजली सांवत यांच्या निर्दशनास येताच त्यांनी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला.
परंतु दुपारची वेळ आणि वारा यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. अवघ्या काही मिनिटांत या आगीत हापूस आंब्याची ४०, काजूची १२५ झाडे, तर बांबूची १५०० हून अधिक बेटे जळून खाक झाली. बागायती सभोवतालचे कुंपन देखील आगीत भस्मसात झाले आहे. श्री. सांवत यांचे सुमारे तीन ते चार लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अदांज आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.