सत्तेचा उन्माद जनतेला पटला नाही : पवार

सत्तेचा उन्माद जनतेला पटला नाही : पवार
सत्तेचा उन्माद जनतेला पटला नाही : पवार

मुंबई ः ‘अब की बार २२० पार’ला जनतेने स्वीकारलेले नाही. सत्ता येते आणि जाते, पण जमिनीवर पाय ठेवावे लागतात, असे सांगतानाच, सत्तेचा उन्माद जनतेला पटलेला नाही, असा जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेच्या निकालानंतर भाजपला लगावला.

निवडणूक निकाल हाती येत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेने दिलेला निर्णय विनम्रपणे स्वीकारला आहे. महाआघाडीतील सर्व पक्षांनी मनापासून परस्परांना सहकार्य केले. राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी प्रामाणिक प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

पक्षांतराला जनतेने पाठिंबा दिला नाही. सत्ता येते, सत्ता जाते; मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. निवडणुकीत एवढे लक्षात आले, की ज्यांनी पक्षांतर केले, त्या लोकांना जनतेने पाठिंबा दिलेला नाही. काही अपवाद वगळले तर काँग्रेस, राष्ट्रवादी यांची साथ सोडलेल्या नेत्यांना जनतेने कौल दिला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारा ही लोकसभेची एकच जागा होती. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. साताऱ्याच्या गादीबद्दल सर्वांना आदर होता. परंतु, त्या गादीशी इमान ठेवले नाही तर काय होते हे लोकांनी दाखवून दिले, असे ते म्हणाले.  उद्यापासून दिवाळी सुरू होत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर आमची बैठक होईल. त्यानंतर मित्रपक्षांसोबतही होईल.

एकंदर जनमत पाहता पक्ष उभारणीची काळजी घेणे, शिवाय नव्या पिढीला बरोबर घेऊन तो अजून व्यापक करणार आहे. राज्य पातळीवर ठिकठिकाणी जाऊन प्रयत्न करणार आहे. आम्ही आमचा पक्ष, मित्रपक्ष यांना घेऊन काम करणार आहोत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com