मराठा क्रांती मोर्चाची आता संघर्षाची भूमिका
मराठा क्रांती मोर्चाची आता संघर्षाची भूमिका

मराठा क्रांती मोर्चाची आता संघर्षाची भूमिका

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाची शांततेची भूमिका संपलेली आहे, आता संघर्षाची भूमिका यापुढे घेणार आहोत. दोन वर्षे आम्ही खूप संयम पाळला आहे. सरकारने आमच्या मूळ मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा आणि त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. शांततेने आम्हाला काहीच मिळालेले नाही म्हणून आता संघर्षाची भूमिका आम्ही घेत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात जर उद्रेक झाला तर त्याला फडणवीस सरकारच जबाबदार असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला.  मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक शनिवारी झाली. या बैठकीत सरकारने मराठा समाजासाठी काढलेला जीआर मराठा क्रांती मोर्चातर्फे फाडण्यात आला. 

फक्त फसव्या घोषणा, फसवे आदेश आणि फसवी आश्‍वासने देऊन मराठा समाजाची फसगत करण्यात आलेली आहे. त्यामुळे सरकारचा आम्ही निषेध करत आहोत. सरकारविरोधात पुढची रणनीती आखण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची बैठक घेण्यात आली. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माणिकराव शिंदे यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. 

नवीन कमिटीची घोषणा  बैठकीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या नवीन कमिटीची घोषणा करण्यात आली. यात आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील, माणिकराव शिंदे, महेश डोंगरे, संतोष सुर्याराव, बन्सी ढोके, अंबादास काचोवे, युवराज सूर्यवंशी, केदार सूर्यवंशी, संजय सावंत, दिलीप गायकवाड, भरत पाटील, सुरेशदादा पाटील, सुनील बोडखे, सोमनाथ मगर यांची निवड करण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com