परतीच्या पावसावर मराठवाड्याची भिस्त

परतीच्या पावसावर मराठवाड्याची भिस्त
परतीच्या पावसावर मराठवाड्याची भिस्त

औरंगाबाद : मराठवाड्यात केवळ ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. पाऊस कुठे आहे, तर कुठे नाही. पीक पोसतोय, मात्र पाणी साठेना असेच चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे. यंदा जून, जुलै व ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. ऑगस्टअखेरच्या आठवड्यात पाऊस झाला. मात्र तो सार्वत्रिक झाला नाही. मराठवाड्याची सारी भिस्त आता परतीच्या पावसावर अवलंबून आहे.

गुरुवारी (ता. ५) सकाळपर्यंत बहुतांश मंडळांत पाऊस झाला. शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पुन्हा पावसाने पाठ फिरविली. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ मंडळांपैकी केवळ ३९ मंडळांतच पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १०, जालना जिल्ह्यातील पाच, बीड जिल्ह्यातील १३, लातूर जिल्ह्यातील १० व उस्मानाबाद जिल्ह्यातील केवळ एका मंडळाचा समावेश आहे.  

औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन मंडळात १५ मिलिमीटर, मांजरी मंडळात ४६ , जालन्यातील घनसावंगी मंडळात २५, आंतरवली टेम्बीत १४ , बीडमधील धोंडराईत २४, तलवाड्यात २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित मंडळांमध्ये केवळ तुरळक ते हलका पाऊस झाला. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७६ तालुक्‍यांपैकी सात तालुक्यांत आजपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. त्यामध्ये हिंगोली, लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुक्‍यासह बीड जिल्ह्यातील तीन व उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तालुक्‍यांचा समावेश आहे. केवळ दोन तालुक्‍यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत १०८.०८ टक्के तर नांदेडमधील मुदखेड तालुक्‍यात १२१.६६ टक्‍के पावसाचा समावेश आहे.

मराठवाड्यातील एकूण ७६ तालुक्‍यांपैकी तब्बल ३० तालुक्‍ंयात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्‍केही पाउस झाला नसल्याची स्थिती आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील एक, जालना, परभणीमधील प्रत्येकी तीन, हिंगोलीतील दोन, बीडमधील तब्बल दहा, लातूरमधील सहा व उस्मानाबादमधील पाच तालुक्‍यांचा समावेश आहे. 

५० टक्‍केही पाऊस नसलेले तालुके

खुलताबाद, जालना, परतूर, मंठा, परभणी, सेलू, जिंतूर, हिंगोली, वसमत, बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, शिरूर कासार, वडवणी, अंबाजोगाई, केज, धारूर, परळी, लातूर, औसा, उदगीर, चाकूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, उस्मानाबाद, कळंब, भूम, वाशी, परंडा.

५० टक्क्यांहून कमी पावसाचे तालुके

तालुका पावसाची टक्‍केवारी
वसमत  ४५.४४
शिरूर कासार ४४.०३
केज ४८.९६
धारूर ४७.४५
औसा  ४९.२०
भूम ४५.९७
परांडा  ४२.९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com