बाजार व्यवस्था पारदर्शक आणि सक्षम करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बाजार व्यवस्था पारदर्शक आणि सक्षम करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बाजार व्यवस्था पारदर्शक आणि सक्षम करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्य सरकार शेतमाल बाजार व्यवस्था खिळखिळी करू पाहत नाही. बाजार समिती जगलीच पाहिजे. परंतु या बाजार समित्यांमध्ये पारदर्शकता यायला हवी. शेतकरी, व्यापारी व इतर घटकांसाठी आशेच दालन व्हायला हवं. संचालक मंडळांनीही विश्वस्त भावनेतून काम करायला हवं. कुंपनंच शेत खायला निघालं, तर काय होईल, त्यामुळे ही व्यवस्था अधिक पारदर्शक व सक्षम कशी होईल, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी(ता.३) आयोजित विविध विकासकामांच्या उद्‌घाटन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार रावसाहेब दानवे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, आमदार अतुल सावे, आमदार इम्तियाज जलील, बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपमहापौर विजय औताडे, बापू घडामोडे आदींची उपस्थिती होती.  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की हाडाचं काडं अन्‌ रक्‍ताचं पाणी करून शेतमाल पिकविणाऱ्या बाजारात चांगला दर असूनही दर मिळत नाही. त्यावर पर्याय म्हणून केंद्र शासनाने ई-नाम योजना आणली. संपूर्ण देशाला एका मार्केटने जोडण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यातील ३० बाजार समित्या त्यामध्ये सहभागी केल्या. या ई-प्रक्रियेतून आतापर्यंत ५५५ कोटींचा व्यवहार या बाजार समित्यांमधून झाला. अजून बऱ्याच व्यवस्था करायच्या आहेत. ई-नामने एक बाजार देशात निर्माण झाल्यास दर्जा आणि विश्वासार्हता हा महत्त्वाचा विषय ठरणार आहे. त्यामुळे बाजार समिती व माल विकणाऱ्यांवर जबाबदारी येणार आहे. बाजार समिती पवित्र जागा, या जागेत चाललणारी सरकारी केंद्रे प्रामाणिकपणे चालावी. बाजार समितीमध्ये आल्यानंतर शासनाच्या, व्यापाऱ्यांच्या योजनांविषयी शाश्वती वाटायला हवी. प्रास्ताविक सभापती राधाकिसन पठाडे यांनी केले. 

स्वाभिमानीचा रोष.. या कार्यक्रमापूर्वी फुलंब्री येथे दहा कार्यालयाची उद्‌घाटने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली. या वेळी सभेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील सनान्से यांनी उभे राहून दुष्काळाचं बोला, पीक विम्याचं बोला, शेतकऱ्यांच्या मदतीचं काय स्वाभिमानी शेतकरी संघटना जिंदाबाद, असा नारा लगावताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सभा सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानीचा बिल्ला लावून फिरणाऱ्या चार-पाच कार्यकर्त्यांना व प्रहारच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ठाण्यात बसून ठेवले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com